पीक विम्याचे पैसे मिळणार शेतकऱ्यांची निराशा दूर. 85 कोटी पीक विमा मंजूर

विम्याचे पैसे मिळणार शेतकऱ्यांची निराशा दूर.

राज्यभरातील शेतकरी विमा कंपनी कडे डोळे लावून बसलेले होते त्यांची निराशा दूर होणार आहे विमाल आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राज्यातील एक लाख 19 हजार शेतकऱ्यांना दिवाळीतील 85 कोटी रुपये विमा भरपाई मिळाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 85 कोटी पीक विमा. राज्यात 144 लाख हेक्टरच्या आसपास खरीप पेरणी झाली होती ज्यादा पावसामुळे अनेक जिल्ह्यात उभ्या पिकांचे तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी काढणी झाल्यानंतर. मालांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती त्यामुळे नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांनी विमा भरपाई कडे डोळे लावून बसले होते विमा कंपन्यांनी आतापर्यंत स्थानिक आपत्ती गटात 76 कोटी तर 9 कोटी रुपये मध्ये अभावी अवस्थेतील दाव्यांचे वाटले आहे.

Read  Shetkari Karjmafi Yadi | शेतकरी कर्जमाफी यादी

विमा योजनेच्या मुख्य घटकातील दाव्यांच्या रखमा अजून मिळाल्या नाहीत त्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे सर्व माहिती हाती आल्यानंतर तसेच सरकारी विमा हप्त्याची रक्कम ताब्यात आल्यानंतर रकमा जमा होतील.

फेब्रुवारीअखेर मुख्य घटकातील रकमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे शासन तसेच विमा कंपन्यांकडून याबाबत अत्यावश्यक प्रत्येक क्रिया कामे सुरू आहेत अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे राज्यातील खरीप 2020 च्या हंगामातील पीक विमा योजना 13 लाख 66 हजार कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तसेच 94 लाख 12 हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज दाखल केले होते.

त्यामुळे अर्जाची संख्या एक कोटीच्या पुढे गेली मात्र एक शेतकरी विविध अर्ज करीत असल्याने शेतकऱ्यांची मूळ संख्या पन्नास लाखाच्या घरातच आहे असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Read  Pik Karj Yojana पीक कर्ज

कंपन्यांना मिळणार केंद्र राज्याचा हप्ता केंद्र शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना विमा योजना यांची केले आहे तरी राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे 2020 चा खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 528 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. तर राज्य शासनाकडून राज्य शासनाचा शेतकऱ्यांचा विमा हप्ता अनुदानापोटी 2437 कोटी रुपये तर केंद्रशासनाकडून 2247 कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळणार आहे.

परतीच्या पावसाने तसेच अति पावसाने शेतकऱ्यांचे झालेले खूप मोठे नुकसान होते प्रत्येक शेतकरी विमा कंपनीच्या इकडे डोळे लावून बसलेला आता मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी होते तर आता विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना लवकरच विमा कंपनीचे पैसे वाटप करण्यात येतील तरी शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा काढणे गरजेचे आहे कधीही आपले विकासाचे नुसकान होऊ शकतो त्याच्यासाठी पिक विमा काढणे गरजेचे आहे

Leave a Comment