सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा (Mahaurja) Saur Krushi Pamp Yojana

सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत( महाऊर्जा ) 

सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा (Mahaurja) Saur Krushi Pamp Yojana. महाराष्ट्रातील विजेची वाढती मागणी व ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पर्यायी ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती करणे आता अपरिहार्य बनले आहे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत यापैकी सौरऊर्जा हा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे ही ऊर्जा शाश्वत व निरंतर स्वरूपाची आहे म्हणून भविष्यातील ऊर्जा सुरक्षेची गरज पाहता या सूत्राचा वापर करणे नितांत गरजेचे झाले आहे.

कृषिप्रधान महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कृषी पंप विज जोडणी साठी मागणी आता वाढत आहे. सोबतच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या धडक सिंचन योजना अंतर्गत नवीन 25000 विहिरीचे काम पूर्ण होत असेल त्याची जोडणी देणे आता गरजेचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात वनक्षेत्राच्याअडचणीमुळे पारंपारिक पद्धतीने ऊर्जा पोहोचणे अतिशय अडचणीत असून खर्चिक असल्यामुळे अशा ठिकाणी सौर कुषी पंप देणे गरजेचे आहे महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उत्पन्न वाढविण्यासाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर एक लाख सौर कृषी पंप योजना जाहीर केली असून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण याची पदनिर्देशित संस्था म्हणून नियुक्ती केली गेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे 30% उर्वरित अर्थसहाय्य संबंधित संस्था मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

Read  Maha Police Bharti Ground Test 2022 Date | पोलिस भरती मैदानी चाचणी २०२२ तारीख.

सौर कृषी पंप योजना अंतर्गत (pocra) कोणते शेतकरी लाभार्थी अर्ज करू शकतात त्यासाठी त्यासाठी नियम अटी व निकष खालीलप्रमाणे –

  • महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी
  • अतिदुर्गम भागातील डोंगराळ परिसरातील शेतकरी.
  • राज्यातील अकोला ,अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्र पाच एकरपेक्षा जास्त नसावे.
  • विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी.
  • महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकी त्यांना तांत्रिक अडचणीमुळे आधीच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य झाले नाही असे शेतकरी अर्ज करू शकतात.
  • पाच एकर पेक्षा जास्त परंतु दहा एकरपेक्षा कमी जमीन क्षेत्र असलेले शेतकरी यात सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना 15 टक्के लाभार्थी हिस्सा भरुन सहभागी होता येईल.

लाभार्थ्यांची निवड ही शासनाच्या ठरललेया निकषानुसार लाभार्थ्याची यादी आणि प्राधान्यक्रम हा जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून ठरविण्यात येईल सदर यादीनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार योजनेची अंमलबजावणी महावितरण मार्फत करण्यात येईल. महाऊर्जा या राज्य शासनाच्या मूलाधार संस्थेकडून तांत्रिक सहाय्य करण्यात येईल.

 सौर कृषी पंप उद्दिष्टपूर्ती मध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर सध्या चालु वीज पंप आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत योजने चा लाभ घेऊन विहिरीवर पंप दिला आहे तेथे वीज पंपाची नवीन जोडणी महावितरण मार्फत दिली जाणार नाही.

महिला यांच्याकरिता शासनाच्या विविध योजना 

शासनामार्फत दिलेली योजनेची उद्दिष्टे Saur Krushi Pamp Yojana 

केंद्र सरकारच्या योजनेनुसार महाराष्ट्रात एकूण 10,000 सौर कृषी पंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे योजनेचा लाभ उद्दिष्ट हे केंद्र शासनाच्या धोरणानुसार उपलब्ध वित्तीय सहाय्य यावरच अवलंबून राहील.
ही योजना डा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये राबविली जाणार असल्याने लाभार्थ्यांचा हिस्सा कमीत कमी ठेवला गेला आहे .

सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे योजनेचे फायदे –

 महावितरण या कंपनीच्या दराप्रमाणे प्रति कृषी पंप विज जोडणी साठी अंदाजे रुपये एक लाख 76 इतका सरासरी खर्च अपेक्षित आहे सौर ऊर्जेवर आधारित दहा हजार कृषी पंप विज जोडणी देण्याच्या या योजनेमुळे पारंपरिक पद्धतीने कृषी पंप विज जोडणी साठी कराव्या लागणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.
कृषी पंपाचे वीज बिलाच्या ऐवजी शासनाकडून देण्यात येणारा अनुदानातील बचत होणार आहे. औद्योगिक तसेच वाणिज्य ग्राहकांना कार्यालय विजयामुळे कृषी पंप ग्राहकास प्रतियुनिट रुपये 3.7 तर इतकी क्रॉस सबसिडी मिळणार सौर ऊर्जेव तेर आधारित दहा हजार कृषी पंप विज जोडणी देण्याचे या योजनेमुळे सदरील क्रॉस सबसिडी कमी होऊ शकते त्यामुळे इतर ग्राहकांचे वीजदर नियंत्रण ठेवणे शक्‍य होनार आहे.

Read  National Farmer's Day | शेतकरी दिनाचे महत्व

तेही योजना महाऊर्जा महावितरण यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून या योजनेची विहित कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय अशा सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रधान सचिव हे अध्यक्ष तर व्यवस्थापकीय संचालक महावितरण, हे सदस्य सचिव असतील महाऊर्जा चे महासंचालक हे सदस्य म्हणून असतील कृषी आयुक्त ,संचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महावित चीरण संचा तेलक महावितरण महाव्यवस्थापक इत्यादींचा सदस्य म्हणून समावेश आहे.

सौर कृषी पंप योजना जिल्हास्तरीय समिती –

संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर अधीक्षक अभियंता महावितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच माहूरच्या अधिकारी इत्यादी सदस्य म्हणून आहेत.

सौर कृषी पंप योजनेची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे –

राज्यामध्ये सौर पंप पथदर्शी योजना ऊर्जा विभाग महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी महावितरण यांच्या समन्वयाने राबविण्यात येते. महा ऊर्जा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ही केंद्र शासनाची मूलाधार संस्था असल्याने या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक मापदंड केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सल्ल्याने कडून देण्यात येतील. या योजनेत संपूर्ण काम शंभर टक्के तर नक्की पद्धतीने निवेदनाद्वारे महावितरण मार्फत कंत्राटदाराची नेमणूक करून करण्यात येईल.

कृषी पंप हे एक विशेष तंत्रज्ञान असल्याने गुणवत्ता नियंत्रण हा महत्त्वाचा घटक आहे तसे नाही पूर्ण माऊलीच्या कडे आहे शेती विषयक नाही पुन्हा कृषी वाकडे असून महावितरणकडे अंमलबजावणीचे काम आहे ही बाब पाहता वरील प्रमाणे अधीक्षक अभियंता महावितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व महाऊर्जा यांनी निर्देशित केलेल्या अधिकारी यांच्या समितीवर या योजनेचे गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी राहील. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या किमान तांत्रिक मापदंडानुसार सोलर मॉडेल हे भारतीय बनावटीचे इसी प्रमाणित किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार प्रमाणित असा असावी.

Read  Tomato in Marathi 2021 टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

याबाबत साहित्य पुरवठादार कंपनी मध्ये साहित्याची तांत्रिक मापदंडानुसार पाहणी करून साहित्याचा योग्य ते बाबत महावितरण कंपनीची माहिती देईल. सोबतच विहीर किंवा कूपनलिकांचा व पाण्याची पातळी तसेच पीक पगारी त्यानुसार तांत्रिक सर्वेक्षण करून वास्तविक सौर कृषी पंप क्षमता ठरविण्यासाठी अधीक्षक अभियंता महावितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच महाऊर्जा यांनी निर्देशित केलेल्या अधिकारी यांची उपसमिती प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समित्या

या उपसमिती कडून तांत्रिक सर्वेक्षणाचे व सौर कृषी पंप क्षमता वाढविण्याचे काम करून घेण्यात येईल. तसेच यामध्ये जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादी नुसार महावितरण कंपनी मार्फत महाऊर्जा यांच्या समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व कृषी पंपाचा हमी कालावधी पाच वर्षाचा असणे व सोलर मॉडेल ची वारंटी दहा वर्षाची असणे योजनेतील ऑफ ग्रिट सौर कृषीपंपासाठी शासनाने ठरविलेल्या निकषानुसार जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येईल.

सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा (Mahaurja) Saur Krushi Pamp Yojana

पात्र लाभार्थी सौर कृषी पंप बसवण्यासाठी आवश्यक लाभार्थी हिस्सा महावितरणच्या संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयात जमा करण्यात येतो. सौर कृषी पंप स्थापित झाल्यानंतर स्थापना व कार्यवाही अहवाल अधीक्षक अभियंता महावितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच महाऊर्जा यांनी निर्देशित केलेल्या अधिकारांच्या उपसमिती मार्फत करण्यात येतो. सौर कृषी पंप कार्यान्वित झाल्याचे हा अहवाल महावितरण’कडून प्राप्त झाल्यानंतर माहूरच्या केंद्र शासनाकडे व्यवसायाच्या रकमेची मागणी करून सदर निधी महावितरण कंपनीस अदा करते.

सौर प्रकल्पाच्या प्रगती अहवालानुसार वित्तीय सहाय्य मिळणार असल्याने राज्य शासनाला एकत्रित प्रगती अहवालासह उपयोगिता प्रमाणपत्र रवाना करणे आवश्‍यक आहे त्यामुळे उर्वरित पुढील वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते याबाबतीत उचित कार्यवाही करण्याची जबाबदारी महाऊर्जा व महावितरणची आहे. स्थापित सौर कृषिपंपाची रॅन्डम पद्धतीने तपासणी महाऊर्जा मार्फत करण्यात येते. योजनेची अंमलबजावणी करताना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे नमुने स्थापना अहवाल उपयोगिता प्रमाणपत्र व अनुषंगिक बाबी महावितरण मार्फत तांत्रिक तपासणी नमुना महाऊर्जा मार्फत निर्गमित करण्यात येतो. अशाप्रकारे शेतकरी आपल्या शेतात कुषी सौर पंप या योजनेअंतर्गत घेवुन आपला विकास साधु शकतात.

 

Leave a Comment