CLOSE AD

लाडकी बहीण योजना: पुन्हा सुरु होणार अर्जप्रक्रिया? महिलांची वाढती मागणी सरकारसमोर

Published On: September 19, 2025
Ladki Bahin Yojana New Form Started

Ladki Bahin Yojana New Form Started : महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील वर्षी अर्जप्रक्रिया बंद झाल्यानंतर आता अनेकांनी ती पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. विशेषतः २१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मुलींसाठी अर्जाची संधी द्यावी, अशी मागणी सरकारकडे होत आहे.

लाडकी बहीण योजना – महिलांसाठी आधार

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासा ठरली आहे. दर महिन्याला ₹१५०० चा मानधन मिळाल्याने महिलांना घरखर्च, शिक्षण व इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यात मदत झाली. परंतु, नवीन अर्जदारांसाठी दारे बंद झाल्याने अनेकांना नाराजी वाटू लागली आहे.

अर्जप्रक्रिया का थांबवली?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने अर्जप्रक्रिया थांबवली. त्या वेळी योजनेत तब्बल २.५ कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केला होता. पडताळणीच्या टप्प्यात अनेक अपात्र ठरले आणि काहींचे अर्ज बाद करण्यात आले. याच कारणामुळे नवीन अर्ज स्वीकारले गेले नाहीत.

नव्या मुलींची अडचण

२१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना या योजनेसाठी पात्रता मिळते. मात्र, अर्जप्रक्रिया बंद असल्यामुळे आता हजारो मुलींना अर्ज करता येत नाही. सोशल मीडियावरून अनेकांनी ही तक्रार मांडली असून, “आम्ही पात्र असूनही लाभापासून वंचित का?” असा प्रश्न विचारला जात आहे.

आदिती तटकरे यांच्याकडे मागणी

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच लाडकी बहीण योजनेबाबत ट्विट केले होते. त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. “२१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आम्हाला अर्ज करता येत नाही, सरकार कधी संधी देणार?” अशा प्रकारच्या कमेंट्स मोठ्या प्रमाणात दिसल्या.

सध्याचा लाभ घेणाऱ्या महिला

सध्या राज्यात सुमारे २ लाख ३० हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्याशिवाय अजून काहींच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये देखील अनेकांना अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे लाभार्थींची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारकडून काय निर्णय येणार?

सध्या सरकारने पुन्हा अर्जप्रक्रिया सुरु करण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. मात्र, महिलांची वाढती मागणी आणि जनतेचा दबाव पाहता सरकार लवकरच यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. जर अर्जप्रक्रिया सुरु झाली, तर २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला थेट अर्ज करू शकतील.

लाडकी बहीण योजनेत नवीन अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. सरकारने या संदर्भात तातडीने निर्णय घेतल्यास हजारो महिलांना न्याय मिळेल.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment