CLOSE AD

या सरकारी योजनेत महिलांना मिळणार ७००० रुपये महिना , असा करा अर्ज

Published On: September 21, 2025
Vima Sakhi Yojana

Vima Sakhi Yojana : मंडळी महिलांचे सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. याच उद्देशाने केंद्र सरकारकडून विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. महिलांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि भारतीय जीवन विमा निगम (LIC) यांनी एक विशेष योजना राबवली आहे – एलआयसी विमा सखी योजना.

ही योजना विशेषता ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील महिलांसाठी तयार करण्यात आली असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

योजनेचा उद्देश (Objective of the Scheme)

एलआयसी विमा सखी योजना ही महिलांसाठी स्वावलंबन आणि उद्योजकतेचा मार्ग खुला करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला अद्यापही आर्थिक दृष्ट्या मागे आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्थिर साधन नसते. अशा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना पुढे आणण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. प्रशिक्षण घेऊन त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात आणि नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

योजनेचे वैशिष्ट्ये (Salient Features of LIC Vima Sakhi Yojana)

1) महिलांसाठी खास योजना– ही योजना केवळ महिलांसाठी आहे, विशेषता ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
2) व्यावसायिक प्रशिक्षण – सहभागी महिलांना विमा विक्री, आर्थिक साक्षरता, ग्राहक संवाद, कस्टमर सर्व्हिस, आणि इतर संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
3) स्टायपेंड सुविधा – प्रशिक्षणाच्या कालावधीत महिलांना रु. ५,००० ते ७,००० पर्यंत स्टायपेंड दिले जाते, जे त्यांच्या मूलभूत गरजांसाठी उपयुक्त ठरते.
4) एलआयसी एजंट म्हणून संधी – प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसी एजंट कोड आणि ‘विमा सखी’ प्रमाणपत्र दिले जाते, जे त्यांना अधिकृत एजंट म्हणून काम करण्यास पात्र ठरवते.


5) कमाईची संधी – विमा पॉलिसी विक्रीवर आधारित कमिशन व इन्सेन्टिव्ह च्या माध्यमातून महिलांना उत्पन्न मिळते. सुरुवातीला वर्षभरात ४८,००० रुपयांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता असते.
6) उद्योजकतेला चालना – ही योजना महिलांमध्ये उद्योजकता वाढवते. स्वतःचा व्यवसाय किंवा नेटवर्क तयार करण्याची संधीही त्यांना मिळते.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆

पात्रता (Eligibility Criteria)

  • अर्जदार स्त्री असावी.
  • वय १८ ते ७० वर्षे दरम्यान असावे.
  • किमान १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • ग्रामीण किंवा अर्ध-शहरी भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment