Ativrushti Nuksan Bharpai 2021 मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जून ते ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरता शासन निर्णय निघालेला आहे 21 ऑक्टोबर 2021 रोजी हा शासन निर्णय निघाला असून या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे, जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिती मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.
Ativrushti Nuksan Bharpai अतिवृष्टी नुकसान भरपाई
Table of Contents
खालील प्रमाणे मदत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे
1. जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी 10 हजार प्रती हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत.
2. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 15 हजार प्रती हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत.
3. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत.
मदतीची रक्कम प्रदान करताना संदर्भातील शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाप्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईट वर आपण त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी पाहू शकता