5 Richest Farmers in India 2022 | देशातील 5 सर्वात श्रीमंत शेतकरी २०२२ .

भारत देश हा शेतीप्रधान देश आहे व त्यामध्ये बहुतांश शेतकरी आहेत. त्यामधील बहुतांश शेतकरी खूप श्रीमंत आहेत. आपल्याला ही तर नावे माहीत असतील की कोणती व्यक्ती ही व्यवसायात श्रीमंत आहेत पण आपल्यालाही माहीत असणे गरजेचे आहे की कोणता शेतकरी हा खूप श्रीमंत आहे व तो शेतीच्याच जोरावर श्रीमंत झाला आहे. श्रीमंताच्या यादीत बहुतांश मोठे लोक हे व्यवसायच करत आहेत. आपल्या भारत देशातील बहुतांश शेतकरी एक करोडपती आहेत दरवर्षी ते आपल्या मेहनतीने स्वतःच्या शेतातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करतात. आज या लेखात आपण अशाच श्रीमंत शेतकऱ्यांविषयी पाहणार आहोत त्यामधील पहिले हे 1) राम शरण वर्मा सर्वात श्रीमंत शेतकरी आहेत राम शरण वर्मा हे उत्तर प्रदेश मधील दौलतपूर मध्ये राहतात उत्तर प्रदेशातील खूप मोठे शेतकरी आहेत. त्यांची कहाणी म्हणजे 1990 मध्ये त्यांच्याजवळ फक्त पाच एकर शेती होती त्यांनी याच पाच एकर शेतीतून सुरुवात करत आज त्यांच्याकडे 200 एकर पेक्षा जास्त शेती आहे त्यांना या कामासाठी पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या शेतीमध्ये ते भाजीपाल्याचे शेती करतात याच शेतीतून ते दोन कोटींच्या आसपास वार्षिक उलाढाल करतात.
2 ) देशातील दुसऱ्या श्रीमंत शेतकरी म्हणजे रमेश चौधरी हे राजस्थान मधील जयपुर मध्ये राहतात यांच्याकडे तीन पॉलिहाऊस आणि एक ग्रीन हाऊस अशी शेती आहे. त्यामध्ये ते टोमॅटो काकडी अशी लागवड करतात यांचीही आर्थिक उलाढाल ही वर्षाचे दोन कोटींच्या आसपास आहे. फुलांची लागवड ते ग्रीन हाऊस मध्ये करतात त्याचबरोबर ते मक्याची ही खूप मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.
3) देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शेतकरी हे प्रमोद गौतम आहेत हे शेती करण्याच्या आधी ऑटोमोबाईल इंजिनियर होते ते कंपनीत काम करत होते. त्यांनी 2006 मध्ये त्यांची नोकरी सोडून 26 एकर शेती पासून सुरुवात केली. सुरुवात करताच त्यांनी उत्पादन घेणे चालू केले व त्यामध्ये त्यांना खूप नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी फळाची शेती करण्यास सुरुवात केली जसे द्राक्ष केळी पेरू लिंबू संत्रा फळांची बागायती शेती केल्यानंतर त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले त्यानंतर त्यांनी एक कडधान्य गिरणी देखील उभारली.

Read  MSRTC Free Bus Service In Maharashtra 2023 | मोफत बस सेवा महाराष्ट्र २०२३ .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment