शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जमीन हस्तांतरणाची वाटणी फक्त शंभर रुपयात होणार आहे असे शासनाने जमिनी विषयी आदेश दिले आहेत . शासनाने त्यासाठी एक परिपत्रकही काढले आहे. त्यामध्ये शंभर रुपयांमध्ये जमीन आपल्या नावावर करता येते. काही काळा आधी वडिलाकडून मिळणारी जमीन मुलाला स्वतःच्या नावावर करण्यासाठी किंवा आईकडून मिळणारी जमीन मुलाच्या नावावर करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागत होता त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा येत होता परंतु आता महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार वडिलोपार्जित जमीन फक्त शंभर रुपयांमध्ये स्वतःच्या नावावर होणार आहे.