गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस पडत आहे. राज्यातील रायगड आणि त्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये अचानक जोरदार पाऊस आणि विजेचा अनुभव आलेला दिसतो. यामागे भौगोलिक कारणांचा उलगडा जर केला तर ढगांच्या अभूतपूर्व दाटीमुळे असा मुसळधार पाऊस कोसळल्याच दिसून आलेला आहे. Heavy Rain With Lightening in Maharashtra
रडारच्या क्लिप मधून असे उघड झालेला आहे की, रायगड जिल्ह्यामध्ये बुधवारी ढगांची दाटी झाली होती आणि त्यामुळे रडारच्या क्लिप मधून मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे 10 ते 12 किलोमीटर एवढ्या उंचीचे ढग दाटून आलेले होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे कमी वेळात तेथे जोरदार पाऊस कोसळला.
मित्रांनो अनेक ठिकाणी ढग फुटी झाली जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडात अनेक भागांमध्ये दिसून आला शेजारील जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस पडला मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह झालेल्या पावसा मागे देखील हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.
काही वेळा अनेक ठिकाणी विधानसभा पाऊस झाला आणि त्यानंतर लगेचच पाऊस थांबला चा अनुभव सुद्धा आलेला आहे. आता पुढील 3 दिवस 17 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस राज्यातील अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह होईल, अशी दाट शक्यता पंजाब डक हवामान तज्ञ वर्तविण्यात येत आहे. राज्यात पाऊस साधारणतः 19 तारखेपर्यंत राहील आणि नंतर परतीचा प्रवास करेन असं सुद्धा सांगितल्या जात आहे.
राज्यात इतर ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ढगांची दाटी झाल्यामुळे आणि काही ठिकाणी दहा किलोमीटर उंचीपर्यंत ढग असल्यामुळे विजा होत असताना घराबाहेर अजिबात पडू नका असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वीज कोसळल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना सुद्धा समोर आले आहेत त्यामुळे काही दिवस विजा चमकत असताना घरातच राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे.
Originally posted 2022-06-04 12:04:55.