Pik Vima Yadi 2022- शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. विमा कंपन्या मोठ्या लोकांना हाताशी घेऊन फक्त 200 कोटी रुपयांमध्येच विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याच्या तयारीत होते, परंतु एवढी कमी रक्कम जर शेतकऱ्यांना पिक विमा पोटी मिळाली तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले असल्यामुळे ही रक्कम त्यांच्यासाठी तुटपुंजी ठरणार आहे, हे शिवसेनेने हेरले आणि उपोषण करत पिक विमा कंपन्यांना 200 कोटींच्या वर म्हणजेच पूर्ण पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य केले. यासाठी उपोषणे करण्यात आली.