Shetkari Karjmafi Yadi | शेतकरी कर्जमाफी यादी

Shetkari Karjmafi Yadi शेतकरी मित्रांनो एप्रिल 2015 ते मार्च  2019 या कालावधीमध्ये 2 लाख रुपये पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. आणि ह्या कर्जमाफीची प्रक्रियासुद्धा पार पडली होती.

ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी होते त्यांना 15 एप्रिल 2021 ही मुदत देण्यात आली होती. या कर्जमाफी प्रक्रियेमध्ये 35 लाख लाभार्थी पात्र झालेले होते. एप्रिल 2015 ते  मार्च 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखापेक्षा कमी कर्ज आहे त्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आली नव्हती.

प्रियांका खोलगडे बायोग्राफी 

https://biographyof.in/index.php/2022/02/16/priyanka-kholgade-age/

त्यामुळेच नाव न आलेल्या शेतकऱ्यांना असे वाटायचे की पुढे यादी येईल का त्यामध्ये आपले नाव असेल का? त्यामुळेच आता पोर्टल वरती 2 लाख रुपयांपक्षा कमी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर झालेली आहे.

Read  कृषी कर्जाला चक्रवाढ व्याजमाफी नाही, केंद्र सरकार

यादी कशी पहायची? आपल्याला अपात्र कोणत्या कारणामुळे करण्यात आलेले आहे? आपण पात्र कसे ठरू?:याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल.

त्याकरता सर्वात प्रथम आपल्याला आपल्या सीएससी (CSC) पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. त्याकरिता आपल्याला connect.csc.gov.in या पोर्टल वर जाऊन युजरनेम किंवा ईमेल टाकायचा आहे, पासवर्ड भरायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकून साइन इन करायचे आहे.

लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड ला आपल्याला एक सहज बटन दिसेल त्या सर्च बटन मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी सर्च करा किंवा कर्जमुक्ती सहज करा. त्यानंतर फोटो दाखवले जाईल फोटो दाखवल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कर्जमाफी च्या पोर्टलला येणार.

Aadhaar authentication list download यावर click करायचे आहे. आपली सीएससी आयडी ज्या जिल्ह्याची असेल त्या जिल्ह्याची यादी तुम्ही बघू शकता. यामध्ये तालुकानिहाय अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या दाखवण्यात आलेले आहेत. एक्सेल फाईल ला क्लिक केल्यानंतर ग्रीन बटनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर यादी डाऊनलोड होईल. डाउनलोड झालेल्या फाईल मध्ये गावानुसार अपात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल.

Read  Karj Kase Fedave? Karj Mukt Kase Vhave? | कर्ज कसे फेडावे?

या डाऊनलोड झालेला एक्सेल फाईल मध्ये सर्वात शेवटचा कॉलम आहे की, आपण कशामुळे अपात्र झालेले आहोत. पहिलं कारण यामध्ये दिसते की, म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट, दुसरे कारण असू शकते की, छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजनेमध्ये लाभ मिळालेला आहे. आणि त्यामुळेच या कर्जमाफी मध्ये ला मिळालेला नसेल.

तिसरे कारण सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे टॅक्स पेयी  म्हणजे आपण इन्कम टॅक्स भरता अशाप्रकारे तिसरं कारण हे सर्वात जास्त लोकांना दाखवण्यात आलेला आहे.

या तीन कारणांपैकी चुकून एखादा कारण तुमच्यासमोर लागला असेल तर तुम्ही पात्र कसे ठरू शकता. तर तुम्ही बँकेत संपर्क करू शकता तसेच उपनिबंधक कार्यालय मध्ये संपर्क साधू शकता त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. तिथे आपल्याला न्याय मिळत नसेल आणि जर आपण पात्र असाल तर कर्ज समितीचे अध्यक्ष हे त्या तालुक्याचे तहसीलदार असतात सर्व पुरावे कागदपत्रे घेऊन तहसीलदारांना एक अर्ज द्यायचा आहे जेणेकरून आपण पात्र असाल तर आपल्याला कर्जमुक्ती मध्ये फायदा मिळू शकेल.

Read  शेतकरी श्रीमंत का नाही? Farmer Information in Marathi

 

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३

Leave a Comment