PM Krishi Sinchan Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करायचा काय आहे? पात्रता आपल्याला लाभ कसा घेता येईल ही सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया
महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आधुनिक शेती कडे शेतकऱ्यांचा कॉल आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचा पाण्याचे साधन म्हणजे ठिबक सिंचन आणि पाण्याचा अपव्यय न होता शेतीला पाणी पाहिजे त्या प्रमाणात दिल्या जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते
म्हणूनच या लेखांमध्ये कृषी सिंचनाच्या कोणत्या योजना आहेत आणि त्यासाठी आपल्याला अर्ज कोठे करता येईल कसा करता येईल हे सविस्तर जाणून घेऊया.
शेतकरी सर पारंपारिक पद्धतीने शेती साठी पाणी देत असतील तर त्यामुळे इंधन बचत होत नाही पाण्याचा अपव्यय होतो आणि वेळ सुद्धा खर्ची पडतो म्हणून आजच्या काळामध्ये सर्वात जास्त पसंतीचे साधन ठिबक सिंचन आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिल्या जाते म्हणजेच आपण ठिबक सिंचन व तुषार सिंचन मार्फत पाणीपुरवठा करू शकता. तसं पाहिलं तर महाराष्ट्र ठिबक सिंचना मध्ये अग्रेसर आहे.
लहान-लहान नळ्यांच्या साह्याने थेंब-थेंब पाणी पीकास दिले जाते. ज्या पद्धतीला आपण ठिबक सिंचन सुद्धा म्हणतो. याउलट मोठ्या पाइपच्या साह्याने शेवटच्या स्वरूपात शेतीचे पाणी दिले जाते त्याला तुषार सिंचन असे म्हणतात ज्यास आपण स्प्रिंकलर सुद्धा म्हणतो.
भारतात एकट्या महाराष्ट्रामध्ये 60 टक्के ठिबक सिंचन आहे. तुषार सिंचन हे पावसासारखे असते.
Priyanka kholgade age biography, Wikipedia, Inatagram,photos 2022
कृषी सिंचन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
2016 17 पूर्वी एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या सर्वे नंबर साठी चा लाभ घेतला असेल पुढील दहा वर्ष त्याला त्या सर्वे नंबर व लाभ घेता येणार नाही आणि जर पत्र आजचा मध्ये एखाद्या सर्वे नंबर वर एखाद्या शेतकऱ्याने लाभ घेतला असेल तर पुढील सात वर्ष त्या सर्वे नंबर वर त्या शेतकऱ्यास लाभ घेता येणार नाही.
अनुसूचित जाती जमाती करिता जातीचा दाखला आवश्यक आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे आठ व सातबारा उतारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे कायमचे वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे पाच एकर मर्यादा येतील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल सुक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी केंद्र शासनाच्या सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के सबसिडी आहे उरलेल्या शेतकऱ्यांना 45 टक्के सबसिडी आहे.
कोणती कागदपत्रे लागतील?
8 अ,आधार कार्ड, सातबारा खरेदी केलेल्या संचा च बिल, जातीचा दाखला, विज बिल पूर्व संमती पत्र, स्वयंघोषणापत्र
Onliine अर्ज कसा करावा?
प्रथम आपल्याला https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आपल्याला शेतकरी योजना निवडावे लागेल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे निवडावे प्रथम नोंदणी करण्यासाठी नवीन वापर करता अशा प्रकारे ऑप्शन निवडावा त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव युजरनेम व पासवर्ड टाकायचा आहे त्याकरता आपल्याकडे एक ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
युजरनेम व पासवर्ड टाकून आपल्याला पुढे जायच आहे आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल त्याला व्हेरिफाय करा लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आधार कार्ड टाकावा लागेल त्यानंतर प्रमाणित करून घ्या त्यांचा शेतकऱ्याने आपली वैयक्तिक माहिती टाकायची आहे आणि शेतीची माहिती सुद्धा टाकायचे आहे लॉगिन झाल्यानंतर आपल्याला एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ तिथे घेता येईल.
पैकी आपल्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हा पर्याय निवडावा लागेल सिंचन योजनेच्या पैकी जो पर्याय तुम्हाला हवा असेल तो निवडावा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करावा.
अर्ज भरल्यानंतर प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला या योजनेअंतर्गत ज्या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल ती वस्तू तुम्हाला प्रथम क्रमांकावर ठेवावी लागेल. नंतर प्राधान्य क्रमांक दोन तीन चार कशाप्रकारे तुम्हाला निवडावा लागेल त्यानंतर कृषी सिंचन योजना ची फी भरावी लागेल आणि आपले सर्व कागदपत्र अपलोड करावे लागतात.
शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरी अर्ज एकच करावा लागेल च्या आधारे आपल्याला अनेक योजनांचा लाभ घेता येईल तुम्हाला येथे दुसरा अर्ज करता येणार नाही जर काही चूक असल्यास पहिला अर्ज काढून टाका लागेल नंतरच आपल्याला दुसरा अर्ज करता येईल